रत्नागिरीच्या कलावंतांचे प्रभावी सादरीकरण
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनेनी सादर केले. सत्ता हस्तगत करण्यासाठी सामान्य माणसांचा प्यादी म्हणून होणाऱया वापरावर संकल्प कला मंचच्या कलावंतांनी आपल्या अभिनयाच्या सामार्थ्यावर प्रभावी भाष्य केले.
छायाचित्रे : निखिल गोडसे
वेगवेगळी आश्वासने देऊन सामान्य माणसां आयोजित राज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत गुरुवारी राजकारणावर रूपकात्मक भाष्य करणारे `प्यादी’ हे नाटक रत्नागिरीच्या कलावंतांना भुलवणे, सत्ता हस्तगत केल्यावर त्यांच्या भावभावनांशी खेळणे, ज्यांनी निवडून दिले त्यांच्यावरच अन्याय करण्याची रीत युगे न युगे सुरूच आहे. या सत्ताकारणावर मनोहर सुर्वे लिखित आणि विनोद वायंगणकर दिग्दर्शित `प्यादी’तील व्यक्तिरेखा जिवंत करण्यात रत्नागिरीच्या कलावंतांनी यश मिळवले.
सत्ताकारण असल्याने त्यात वेगवेगळे द्वंद्व आलेच. हे द्वंद्व ज्या दोन सत्ताधीशांचे आहे, त्यात आदित्यनाथ आणि शक्तीदेवी यांचा सत्तासंघर्ष ओंकार पाटील आणि पूजा जोशी या कलावंतांनी आपल्या अभिनय कौशल्याने परिणामकारक पद्धतीने साकारला. संतोष गार्डी(कौटिल्य), जयेश शिवलकर (शिखंडी), निशांत जाधव (विजय), स्वानंद साळवी (सूत्रधार), प्रज्ञ चवंडे (प्रतिमा, मेनका), कृष्णकांत साळवी(निर्मिती देवता) यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारून `प्यादी’तील सत्तासंघर्षाला मोलाची साथ दिली.
नंदकुमार भारती यांचे नेपथ्य, विजयराज उपरकर यांची प्रकाशयोजना आणि रवींद्र साळुंके यांच्या प्रकाशयोजनेने हे नाटक तांत्रिकदृष्टय़ा भक्कम करण्याचा प्रयत्न केला. रंगभूषा ओंकार पेडणेकर यांनी तर वेशभूषा तुषार बनगे आणि ज्ञानेश्वर पाटील यांची होती.