वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये २४ एप्रिलला ‘एहसास कि खुशबू’
युवा गझल, सुफियाना गायिका आणि ज्यांनी भारतीय सांगीतिक क्षेत्रात आपल्या मधुर आवाजाने छाप पाडली आहे अशा कलाकार पूजा गायतोंडे या ‘एहसास कि खुशबू’ हा गझलांचा कार्यक्रम सदर करणार आहेत. वरळी येथील नेहरू सेंटर येथे २४ एप्रिल २०१५ रोजी सायंकाळी ७.३० वाजता गझल गायनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे.
पूजा गायतोंडे यांच्या बरोबर तबल्यावर ओजस अधिया, तंतुवाध्यावर संचित म्हात्रे, बासवर जॉय डे, बॅन्जोवर राशीद खान, किबोर्डवर उमर खान, व्हायोलीनवर रशीद खान हे कलाकार साथसंगत करणार आहेत. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन इव्हेंट कंपनी आणि जिंजर पीआर यांनी केले आहे.
‘एहसास कि खुशबू’च्या माध्यमातून पूजा गायतोंडे यांच्या पहिल्या गझल अल्बमचेही प्रकाशन यावेळी होणार आहे. पद्मश्री पंकज उदास यांच्या हस्ते हे प्रकाशन होणार आहे. पूजा यांनी आपले प्रशिक्षण ज्येष्ठ कलाकारांकडून घेतले आहे. त्यांत गायक पंडित एस सी आर भट्ट, राजा उपासनी आणि सुनीती गांगुली यांचा समावेश असेल. त्यांनी हार्मोनियम वादनामध्ये प्रख्यात ज्येष्ठ पंडित तुलसीदास बोरकर यांच्याकडून तर उर्दू बोलीमध्ये प्रख्यात तज्ञ इब्राहीम दुर्वेश आणि अहमद सखी यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. गझलमध्ये तसेच भावसंगीतामध्ये तलत अझीझ, राजकुमार रिझवी आणि धनश्री पंडित राय यांच्याकडून त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. सध्या त्या उस्ताद मुन्नवर मासूम सय्यद खान यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहेत. खान यांच्याकडे भावगर्भ गझला गाण्याची स्वतःची अशी आगळी शैली आहे आणि त्या सुफी संगीतही शास्त्रीय साज देऊन गातात.
“शास्त्रीय संगीत हे ब-याच अंशी रियाझवर आणि तुम्ही घेत असलेल्या कठोर परिश्रमांवर अवलंबून असते. आवश्यक अशी शैली तुम्ही तोपर्यंत प्राप्त करू शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही चांगला रियाझ करत नाही,” असे उद्गार पूजा गायतोंडे यांनी काढले.
पूजा या एक मराठी कलाकार आहेत आणि त्यांनी आपले आयुष्य मुंबईत व्यतीत केले आहे. त्या उर्दू भाषाही शिकत आहेत.सुरवातीच्या कारकिर्दीमध्ये पूजा यांच्यावर बेगम अख्तर आणि मेहंदी हसन यांचा प्रभाव होता. ‘छाप टिळक’, ‘आज जाने कि जीद न करो’ आणि इतरही काही गझला आणि सुफी संगीताचा त्यांच्यावर विशेष प्रभाव आहे. ‘दिल ए नादान तुझे हुवा हा क्या’ आणि ‘अंजुमान शानसाई’ या त्यांच्या दोन अत्यंत आवडत्या अशा गझला आहेत. “माझी आत्तापर्यंतची सर्वोत्तम अदाकारी ही मी जेव्हा या दोन गझला मुंबईतील एका कार्यक्रमात गायल्या ती होती. त्यावेळी संपूर्ण सभागृह हे फुल्ल होते आणि उपस्थितांनी मला उभे राहून अभिवादन केले होते,” असेही त्या म्हणतात.
संपूर्ण भारतात अनेक कार्यक्रम केल्यानंतर त्यांच्या करीयरचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ‘खजाना’ या महोत्सवामध्ये घेतलेला सहभाग. गझल कलाकार पंकज उधास यांनी आयोजित केलेल्या आणि देशातील सर्व आघाडीच्या गझल गायकांचा सहभाग असलेल्या या महोत्सवात त्यांना गाण्याची संधी मिळाली. त्यांना अनेक आघाडीच्या कलाकारांकडून शाबासकी मिळाली आहे, पण पंडित जगजीत सिंग यांच्याकडून मिळालेली पाठीवरील थाप त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.
पूजा गायतोंडे यांना नुकताच ‘सूर ज्योत्स्ना शास्त्रीय संगीत पुरस्कार’ २२ मार्च २०१५ रोजी प्रदान करण्यात आला आणि महाराष्ट्रातील या होतकरू कलाकाराचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून तोंडभरून कौतुक झाले. ४ एप्रिल २०१५ रोजी पूजा यांनी शबाना आझमी आणि डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी आयोजित केलेल्या मिजवान फॅशन शोमध्येही भाग घेतला होता.
कार्यक्रम- ‘एहसास कि खुशबू’, पूजा गायतोंडे यांच्या गझल गायनाचा कार्यक्रम शुक्रवार – २४ एप्रिल रोजी ७.३० वाजता, वरळी येथील नेहरू सेंटर येथे. अधिक माहितीसाठी– नेहरू सेंटर, वरळी (दूरध्वनी:२४९६४६८०) आणि ८४५१९०१४०४