सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबर अखेरचा दिवस!
‘मानाचि’ (मालिका, नाटक, चित्रपट लेखक संघटना)ने अ. भा. मराठी नाट्य परिषद आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या सहयोगाने उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धा केली आयोजित केली असून, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबर अखेरची तारीख आहे.
या स्पर्धेची प्राथमिक फेरी १२ आणि १३ डिसेंबरला होणार असून,विविध क्षेत्रातील मान्यवर स्पर्धकांना विषय देतील. स्पर्धकांना त्यावर उत्स्फूर्तपणे एक स्कीट सादर करावे लागणार आहे. यातून निवड झालेल्या कलाकृतींची अंतिम फेरी एकांकिका स्पर्धेच्या स्वरुपात २६ डिसेंबरला होणार आहे.
यात सर्वोत्कृष्ट एकांकिकेला रोख २५ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. एकूण दीड लाखांचे पुरस्कार असलेल्या या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट शीर्षक, लेखक, विनोदी लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत आदींसाठीही पुरस्कार आहेत.
स्पर्धेची प्राथमिक फेरी मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये होणार असून, अंतिम फेरीयेथील माटुंगा यशवंत नाट्य मंदिर येथे होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर असून, अधिक माहितीसाठी सुहास कामत (९८२१५९८२३८) किंवा अमृता मोरे (९१६७७६७२३८) यांच्याशी संपर्क साधावा असे ‘मानाचि’ने कळविले आहे.
साधारण १० वर्षांपूर्वी हौशी रंगमंच संघटनेतर्फे अशा पद्धतीचा उपक्रम राबवला जात असे. ज्यात एका ज्येष्ठ लेखकाकडून २० विषय घेतले जात होते. १० दिवस आधी ते जाह्हेर करण्यात यायचे. त्या २० विषयांवर एकांकिका करणारी मुले विविध अनुषंगाने चर्चा करायचे. त्या चर्चेतून विवध विषयांवर भाष्य होऊन नाट्य उभे राहत असे. प्राथमिक फेरीत त्या २० विषयांपैकी एक विषय लॉटमधून काढला जायचा. मिळालेल्या विषयावर अर्ध्या तासाने १० मिनिटांचे लाघुनाट्य परीक्षकांसमोर सादर होत असे . प्राथमिक फेरीत निवड झालेल्या ग्रुपला पुढील १० दिवसांत एकांकिका स्वरुपात सादरीकरण करायला लावले जात असे. या स्पर्धेतून अनेक तरुण लिहिते झाले आणि नावारूपाला आलेत. ज्यात राजेश देशपांडे, देवेंद्र पेम, केदार शिंदे, संतोष पवार, सचिन दरेकर, प्रशांत लोकेसारखे सिद्धहस्त लेखक मिळाले आहेत.
‘मानाचि’ने आयोजित केलेली स्पर्धासुद्धा याच स्वरुपाची असून, त्यात अनेक मान्यवरांकडून विषय घेतले जाणार आहेत. त्यात राकेश सारंग, गंगाराम गवाणकर, नरेंद्र चपळगावकर, मंगेश तेंडूलकर, अरुण नलावडे, सदानंद मोरे, डॉ. गिरीश ओक, राजन खान, सुप्रिया सुळे, दीपक राजाध्यक्ष, निर्मिती सावंत, वासुदेव कामत, अनुराधा गोरे, डॉ. वसंत खटाव, आशुतोष घोरपडे, किशोर कदंम, संदीप पाटील, संजय सोनावणी आदींचा समावेश आहे.