विवेकानंद इन्स्टिट्यूटचे स्वस्च्छता अभियान
विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्चच्या (व्हीईएसआयएम) सीएसआर विभागाने स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून चेंबूरच्या विविध भागांमध्ये ‘मिशन क्लीन चेंबूर’चे अनेक उपक्रम आयोजित केले होते.
२०० हून अधिक विद्यार्थी व २० शिक्षकांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेऊन, विद्यार्थ्यांच्या चेंबूरमधील ठिकाठिकणच्या उपक्रमांना पाठिंबा दिला. यामध्ये समाविष्ट केलेले परिसर होते, नॅशनल सर्वोदय रोड, इनलाक्स हॉस्पिटल, विवेकानंद स्कूल गेट, पूनम पेट्रोल पंप, विवेकानंद स्कूल गेट, लाल डोंगर एन्ट्री (छदन मीथा पेट्रोल पंप), एचएएमसी २ गेट, भट्ट विश्रांती गृह, व्हीईएसआयएम कॅम्पस गेट. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या टीमने स्वच्छता, कचरा उचलणे आणि तो डब्यात टाकणे अशी कामे केली. त्यांनी स्वच्छता पाळण्याबाबत, तसेच पुरेशी स्वच्छता न राखल्यास होणारे विपरित परिणाम व योग्य स्वच्छता राखणे याविषयी जागृती करण्यासाठी घरोघरी जाऊन अभियान राबवले.
व्हीईएसआयएम संचालक डॉ. सतिश मोध म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना अतिशय अर्थपूर्ण आणि रचनात्मक पद्धतीने समाजाशी जोडणे, हा आमचा प्रयत्न आहे. यासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थी समुदायाला समाजामध्ये योगदान देण्यासाठी आवश्यक असलेले गुण अंगी बाणवता येतात. येत्या काही दिवसांत आम्ही अशा आणखी उपक्रमांचे आयोजन करू, याची मला खात्री वाटते. हे उपक्रम तरुण पिढीमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी मोठे योगदान देतील.’
व्हीईएसआयएमच्या सीएसआर प्रमुख व काउन्सेलिंह सायकोलॉजिस्ट्स श्रेया भारतीय यांनी सांगितले की, ‘आपल्या सरकारचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असलेला स्वच्छ भारत उपक्रम, आमच्या पद्धतीने संदेश देण्याच्या दृष्टीने आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. आणि, व्हीईएसआयएममध्ये एकंदर समाजाला सकारात्मक संदेश देतील असे सामाजिक उपक्रम आयोजित करण्यामध्ये आम्ही नेहमीच आघाडीवर राहिलो आहोत. आजच्या उपक्रमामुळे, स्वच्छ भारतविषयी चेंबूरमधील रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण करणे आम्हाला शक्य झाले.”
या उपक्रमात सहभागी झालेल्या भूमी या विद्यार्थिनीने सांगितले की, हा अनुभव अप्रतिम होता. भाजी बाजार हे ठिकाण होते आणि आम्ही रस्ते स्वच्छ करत असल्याचे पाहिल्यानंतर एका दुकानदाराने आम्हाला कोल्डड्रिंक दिले. स्टाफ सदस्य आणि समूह प्रतिनिधी अतिशय पाठिंबा देणारे आणि मदत करणारे होते.”
जिल या आणखी एका विद्यार्थ्याने सांगितले की, ‘सीएसआरने खरेच चांगला उपक्रम आयोजित केला होता आणि त्यामध्ये काम करण्याची संधी आम्हाला दिली!! सुरुवातीला घाण स्वच्छ करण्याबद्दल जरा कसेतरी वाटले, पण स्वच्छतेला सुरुवात आपल्या घरापासून व्हायला हवी आणि आपला देश हे आपले घर आहे, हे आमच्या शिक्षकांनी आम्हाला सांगितले!! स्वच्छ भारत हरित भारत.’