स्टार प्रवाहवरील ‘नकुशी… तरीही हवीहवीशी‘ मालिकेतील उपेंद्र लिमयेने रंगवलेली रणजीत शिंदे ही व्यक्तिरेखा सध्या लोकप्रिय ठरते आहे. रणजीत, म्हणजेच बग्गीवाला चाळीतला रणजीत शिंदे. भले भले ज्याला घाबरतात आणि चाळीतली माणसं ज्याचा रागाला घाबरतात असा रणजीत. छोट्या छोट्या गोष्टींवरून देखील भडका उडणे आणि मग रागाच्याभरात कधी कोणाला काही बोलेल किंवा कधी कोणाचे ‘कान चेक‘ करेल. सगळ्यांना भीती वाटावी असाच त्याचा स्वभाव. पण या स्वभावात फरक पडायचा आणि रणजीतला त्याच्या रागावर ताबा मिळवायला लावायचा हा आपल्या नकुशीचा निश्चय आहे कारण रंजीतला नुकतच प्रोमोशन मिळालं आहे.
चाळकऱ्यांच्या मदतीने नकुने रणजीतच्या रागावर नियंत्रण मिळवायचे ठरवलं. सगळ्यांनी वेगवेगळ्या कल्पना दिल्या त्यातही बायको म्हणून तिच्याकडे असलेल्या हुकुमी एक्क्याचा वापर करण्याचा सल्ला ‘रणजीत राग नियंत्रण मोहिमेत’ मोलाचा ठरला. नकुशीने रणजीतकडे वचन मागितलं कि तो कधीही चीडचीड करणार नाही. रणजीत आधी जरा घाबरला, गोंधळला. पण अखेर त्याने तिला वचन दिलेच. आता दिलेलं वचन तो खरंच पाळतो आहे कि नाही हे तपासायची वेळ आली. सगळ्यांनी मुद्दाम त्याला राग येईल असे वागायचे ठरवले आणि बग्गीवाला चाळीत एक वेगळीच धमाल सुरु झाली. आता नकुशीच्या या प्रयत्नातून रणजीतला आपला तापट स्वभाव त्याच्यासाठीच घातक होता, हे लक्षात येईल का ? ते आता पाहायचे. उपेंद्र लिमयेचा हा वेगळा अंदाज भारी आहे.