राजू बाविस्कर आणि विकास मल्हारा यांचे चित्रप्रदर्शन सुरु
सुप्रसिद्ध चित्रकार राजू बाविस्कर आणि विकास मल्हारा यांचे चित्रप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, एम. जी . रोड, काळा घोडा, मुंबई येथे २० मार्चपासून सुरु झाले असून ते ते २६ मार्चपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कलारसिकांना विनामुल्य खुलं राहील.
राजू बाविस्कर
लासुर हे चोपड़ा तालुक्यामधलं लहानसं गाव. या खेड्यात लहानपण, गावामधला गावगाड़ा, जगण नाकरलेल्या व्यवस्थेमध्ये जन्माला येणे ह्याचे अनुभव इतके विदारक असतात की शब्दामध्ये त्याची फक्त छटा व्यक्त होऊ शकते, अनुभव नाही. हे सर्व विदारक अनुभव, जगण्याच्या अत्यंत बिकट अवस्थेला स्पर्श केलेले बालपण अनुभवल्याने राजू बाविस्कर यांच्या चित्रामधले रंग हे उदासीचि गडद छटा घेऊन येतात. त्याच्या रेखाचित्रामध्येपण याच बाल अनुभव विश्वाचे प्रतिबिंब उमटते. हड़कुळे कुत्रे, हड़कुळया गायी, खंगलेली माणस, डफड (डफ जो एक जातीय खूण घेऊन येतो), तुटलेल्या वहाणा, वेढुन टाकणाऱ्या प्रतिमा या सगळ्यामध्ये हूंदडणारा झिपर्या मुलगा, ज्यात नवीन जगाला समजून घेण्याची उत्कंठा आहे म्हणून आहे त्यात तो आनंदी आहे, जे कदाचित राजू बाविस्कर याचं प्रतिबिंब असेल, म्हणूनच तिच निरागसता आयुष्यभर सरांच्या सोबत आहे. अश्या अनेक प्रतिमांच मिश्रण घेऊन राजू बाविस्कर यांची रेखाचित्र व पेंटिंग प्रवास करतात.
अत्यंत विपन्न अवस्था म्हणजे काय तर राजू बाविस्कर यांचे बालपण, ते अनुभव इतके दाहक व भंयकर आहेत की तथाकथीत सुसंस्कृत समाजाला हे ऐकवणार नाही अस आयुष्य अनुभवलेल्या राजू बाविस्कर या माणसाच थोरपण अस की याची कटुता या माणसामध्ये नाहीच पण त्याची जागा करुणेने घेतली आहे. सतत हसतमुख व समोरच्याला समजून घेण्याची तयारी, शांत व संयमी स्वभाव, कुठल्या वादात नाही की कोणाशी स्पर्धा नाही. आपल काम करत राहण, साधेपणा हाच अलंकार, कुठेही मोठा चित्रकार असल्याचा आव नाही. सरळ साध वागण, उत्साही आनंदी व्यक्तिमत्व, कदाचित मनातले अनुभवाचे गडद रंग कैनवासवर उतरल्यामुळे सरांच मन नितळ आहे. अत्यंत बेरंग आयुष्य असलेल्या बाविस्कर सरांच्या आयुष्याला रंगाचा झालेला स्पर्श एका वेगळ्या जगात घेऊन गेला.
खिरोदा येथे कला महाविद्यालयामध्ये शिक्षण करुन पिँप्राळा येथील पी.एम.मुंदडे पिंप्राळे या शाळेत कला शिक्षक म्हणून रुजू झाले या मुळे लौकिक प्रश्न संपले, पण आतली घालमेल कायम होती. या सर्व जगण्याच प्रकटीकरण करण्याच माध्यम म्हणजे चित्र, या मधून व्यक्त होत राजू बाविस्कर हा चित्रकार प्रवास करतो आहे. अनेक साहित्य नियतकालिक, पुस्तक ही राजू बाविस्कर यांच्या ऱेखाचित्राने प्रसिद्ध आहेत. चित्रकले इतकेच साहित्य क्षेत्रामध्ये पण राजू बाविस्कर हे नाव महाराष्ट्राला सुपरिचित आहे.
चित्रकलेमधील राष्ट्रीय स्तरावरील अनेक पारितोषिक मिळाली आहेत, पण खरा कलावंत सतत अस्वस्थ असतो तसे सर पण कलेमध्ये सतत अस्वस्थ आहेत. त्यांचा शोध निरंतर सुरु आहे.
कोलते सर म्हणाले की राजू नक्कीच मोठा पेंटर होईल त्याच्यामध्ये त्या शक्यता आहेत. यात राजू बाविस्कर यांचं मोठेपण आहे.
कमर्शियल काम वा लैंडस्केप वगैरे केल तर व्यावसायिक वा लोकप्रिय होण सहज व सोप असताना हा माणूस आपल्या मधील शक्यता विविध फॉर्म मधून हाताळून बघतो , हे मोठा चित्रकार होण्याच्या दृष्टीने टाकलेल पाऊल आहे. परिवर्तनच्या अनेक चित्र प्रदर्शनाच श्रेय हे राजू बाविस्कर सर यांनाच आहे.
विकास मल्हारा
निरवतेत… सौंदर्य घातक असतं त्या टेकडीवरुन, खोल घनगर्द दऱ्याखोऱ्या नि चिरंतन हिमाने आच्छादलेल्या शिखरांमागून शिखरांसह, क्षितीजापासून क्षितिजापर्यंत, ३०० मैल पसरलेला हिमालय पहिला; कुठेही एखादं खेडं वा एखादं घरही दिसत नव्हतं.
सूर्यकिरणांनी उत्तुंग शिखरांना स्पर्श केला आणि अचानक ती संपूर्ण पर्वतराजी पेटून उठली. जणू काही आतुनच धगधगत असवी असं अलौकिक तेज होतं. दऱ्याखोऱ्या अधिकच गडद गहिऱ्या झाल्या आणि शांतता असीम, अमृत! त्या अपार सौंदर्याने थक्क होऊन पृथवीनंही श्वास रोखला.
जसजसं ते अरुणकमल प्रचीवर फुलू लगलं तसतशी त्या राजबिंड्या पर्वतरांगांची देदीप्यमान विराटता, शुद्ध सात्विकता जणू हाताने स्पर्शता यावी इतकी जवळ आल्यासारखं वाटली; पण ते सर्व कित्येक योजने दूर होते. आणि दिवसाचा आरंभ झाला. सदासर्वदा, क्षणोक्षणी, निसर्गाची चिरंतन गूढता मी अनुभवतो, पाहतो… आणि व्यक्त करतो.