पदयात्रेला मुंबईतून उत्साहात प्रारंभ
साईबाबांची पालखी घेऊन ‘साईसेवक’ मंडळांतील हजारो भक्तांची पदयात्रा मुंबईवरून २५ मार्चला निघाली. दादर परिसरातून या पालखी पदयात्रेला सुरुवात झाली. श्रीरामनवमी उत्सवाला ही पदयात्रा शिर्डीला पोहोचेल.
या पदयात्रेतसाईसेवक मंडळाचे हजारो कार्यकर्ते व साईभक्त सहभागी झाले होते. साईभक्तांनी प्रत्येक चौकात रांगोळी काढून व पुष्पवृष्टी करून या पालखीचे स्वागत केले. अनेक मान्यवर मंडळी या पदयात्रेसाठी उपस्थित होती.
१९८१ साली स्थापन झालेल्या आणि सर्वप्रथम पदयात्रा सुरु करणाऱ्या या साईसेवक मंडळातील साईभक्तांचा आकडा आता आठ ते साडेआठ हजारांवर गेला आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी साईसेवक मंडळच्या साईपालखी भव्य पदयात्रेचा शुभारंभ (शनिवार २५ मार्च) झाला.