‘शौर्य – गाथा अभिमानाची’
८०च्या काळात अत्यंत गाजलेली ‘अमीरजादा केस’ झी युवा या वाहिनीवरील ‘शौर्य – गाथा अभिमानाची’ या कार्यक्रमधील पुढील स्टोरी आहे. एक अत्यंत हुशार, जवाबदार आणि कर्त्यव्यदक्ष पोलीस अधिकारी इसाक बागवान यांनी ज्याप्रकारे ह्या केसचा मागोवा केला आणि कोर्टात शौर्याने मारेकऱ्याला पकडले हे सर्व अकल्पनीय आहे.
आजचा तंत्रज्ञानाचा वेग अफाट आहे आणि आपले पोलीससुद्धा माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात सायबर आणि तांत्रिक माहिती पुरविण्यासाठी आवश्यक अद्ययावत प्रणालीने सुसज्ज आहे. पण पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. १९८० च्या काळात जेव्हा अनेक प्रकारच्या गुन्हे घडत असत तेव्हा पोलिसांना ते सोडवण्यासाठो स्वतःची हुशारी आणि खबऱ्यांचे नेटवर्क यावरच अवलंबून राहावं लागायचे. या काळात अमीरजादा नावबखान हा कुविख्यात गुंड चरस गांजा यांच्या तस्करीमध्ये असायचा. त्या काळात अमीरजादाच्या पठाण गँगचा मोठा दबदबा होता. त्याच्या नावावर अनेक गुन्हे होते पण कोणी त्याच्याविरुद्ध उभं राहायला तयार नसायचा. त्यावेळी महाराष्ट्र पोलिसांमध्ये खबऱ्यांचे अतिशय उत्कृष्ट नेटवर्क असलेला अत्यंत हुशार असा पोलीस अधिकारी इसाक बागवान हा क्राईमब्रँचच्या टीममध्ये होता. जेव्हा दिलीप कुमार यांच्या शक्ती सिनेमाच्या निर्माता मुशीरभाईंचं किडनॅपिंगची केस क्राईमब्रँचच्या टीमने स्वीकारली तेव्हा इसाक बागवान यांना ही केस देण्यात आली. अत्यंत हुशारीने इसाक बागवान यांनी अमीरजादा आणि त्यांच्या साथीदारांना एक एक करून आपल्या जाळ्यात अडकवले. त्या काळात ना मोबाईल होते ना जीपीस होते मात्र बागवानांची गुन्ह्याची उकल काढताना विचार करण्याची पद्धत, त्यांची हुशारी आणि खबऱ्यांच नेटवर्क यामुळेच ते अमीरजादाच्या प्रत्येक जागेवर पोहचायचे. पण नेहमीच तो निसटून जायचा आणि मात्र शेवटी त्यांनी अमीरजादाला शोधले आणि जेरबंद केले.
अमीरजादा केस गाजली कारण भरकोर्टात न्यायमूर्तींच्या डोळ्यादेखत अमीरजादावर डेव्हिड या मारेकऱ्याने बंदुकीने घातलेल्या गोळ्या आणि त्यांनतर मारेकऱ्याला पकडताना बागवान यांनी दाखवलेलं प्रसंगवधान, हे थरार नाट्यसुद्धा मुंबई अंडरवर्ल्डच्या इतिहासातील पहिली घटना होती. भर कोर्टातुन जर मारेकरी पळून गेला असता तर पोलीस खात्याचीच नव्हे तर न्यायदेवतेची अब्रूसुद्धा वेशीवर टांगली गेली असती. अशी ही कथा झी युवा वर दाखवण्यात येणार आहे.
कर्तव्यदक्ष आणि धाडसी महाराष्ट्र पोलिसांच्या अश्याच वेगवेगळ्या शौर्यगाथा आपल्याला झी युवावर, शौर्य – गाथा अभिमानाची या कार्यक्रमाद्वारे पहायला मिळणार आहे.
इसाक बागवान यांनी अनुभवलेला हाच थरार, त्यांनी केलेलं हेच शौर्य या आठवड्यात येत्या शुक्रवारी आणि शनिवारी रात्री ९ वाजता पुन्हा झी युवावर अनुभवू शकणार आहात.
‘शौर्य – गाथा अभिमानाची’ या मालिकेचे दिग्दर्शन सावधान इंडियाचे दिग्दर्शक – जास्वन्द एंटरटेनमेंटचे सचिन मोहिते, तर लेखन दगडी चाळ सिनेमाचे गाजलेले लेखक अजय ताम्हाणे, कलादिग्दर्शक विवेक देशपांडे, छायांकन शाहिद आणि संगीत प्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी केले आहे.