प्रेक्षकांचे आत्मिक मंथन
थिएटर ऑफ रेलेव्हन्सच्या दिल्ली नाट्य महोत्सवाने प्रेक्षकांचे आत्मिक मंथन केले आणि त्यांच्या चेतनेला नवीन विचार आणि नवीन दृष्टि दिली.
“थिएटर ऑफ रेलवन्स” या नाट्य दर्शनाची निर्मिती आणि त्याच्या प्रयोगशीलतेला २५ वर्षे पूर्ण झाली. या नाट्य दर्शनाच्या निर्मितीच्या काळापासूनच देशा-परदेशात, जिथे जिथे या नाट्यदर्शनाची प्रस्तुती झाली तिथे प्रेक्षकांमध्ये आपली सत् प्रयोगिकता साध्य केली आणि रंगकर्मीं मध्ये आपल्या अद्वितियतेची स्थापना केली . ह्या २५ वर्षात थिएटर ऑफ रेलवन्स नाट्य दर्शनाने न केवळ रंगकर्मीच्या भूमिकेत नाट्य कलेतील समर्पकतेला रेखांकित केले , तर रंग आंदोलनकर्त्याच्या स्वरूपात जन कार्यकर्त्यांना सातत्याने संबोधित केले. प्रेक्षकांचे आत्मिक मंथन केले आणि त्यांच्या चेतनेला नवीन विचार आणि नवी दृष्टि दिली.
ह्या एक चतुर्थांश शतकाच्या कालावधीत थिएटर ऑफ रेलवन्स चे जनक मंजुल भारद्वाराज यांनी भारता सहित युरोप पर्यंत आपल्या नाट्य दर्शनाचे बीजारोपण केले जे आता कल्पवृक्ष होणाच्या प्रक्रियेत आहे. ह्या २५ वर्षीय प्रवासाच्या माध्यमातून मंजुल भारद्वाज यांनी हे सिद्ध करून दाखवले कि, विनासरकारी अनुदान व कॉर्पोरेट प्रायोजित आर्थिक सहयोगाविना जन सहयोगातून रंगकर्म करता येते आणि कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय ते पूर्ण उन्मुक्ततेसह करता येते. अशा वेळेस 25 वर्ष पूर्ण होण्याच्या सन्मानार्थ उत्सव साजरा व्हायलाच हवा म्हणून आपल्या देशाची राजधानी नवी दिल्ली येथील नाट्यगृहात १०,११ व १२ ऑगस्ट २०१७ रोजी तीन दिवसांच्या नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले गेले.
रंगकर्मी, अभिनेत्री आणि दर्शक रोहिणी यांचा अनुभव सादर आहे…. “गर्भ” या नाटकापासून नाट्यउत्सवाची सुरूवात झाली. या नाटकातील कलाकार अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, योगिनी चौक आणि तुषार म्हस्के होते. या नाटकाच्या माध्यमाने जगभरात होत असलेल्या वंशभेद ,जातिभेद, धर्म, आणि राष्ट्रवादाच्या ओढाताणीत अडकलेल्या किंवा लुप्त होत असलेल्या मानवतेला वाचवण्याची संघर्ष गाथा अतिशय सौंदर्यासह सादर केली आहे. सर्व कलाकारांनी अभिनयाच्या स्तरावर उत्तम काम केले, परंतु मुख्य भूमिकेतील अश्विनी नांदेडकर च्या अभिनयाची भूमिका विस्मयकारक होती. प्रत्येक भावना – भय , वेदना असो , आनंद असो ज्या आवेगाने आणि सहजतेने ती रंगमंचावर प्रकट करत होती ते अभूतपूर्व होते.
नाट्य महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी “अनहद नाद – Unheard Sounds of Universe”ची प्रस्तुती झाली. ह्या नाटकात देखील ह्याच कलाकारांनी अभिनय केला. ह्या नाटकात मानवाने न ऐकलेले आवाज ऐकवण्याचा प्रयत्न केला आहे, जो त्याचा स्वतःचा आवाज आहे. परंतु तो स्वतः कधी ऐकू शकला नाही कारण त्याला आवाज ऐकण्याची नाही तर कल्लोळ ऐकण्याची सवय झाली आहे. असा कल्लोळ जो कलेला आणि कलाकाराला उत्पादिकरणात अडकवतो , जो जीवनाला प्रकृतीची अनमोल भेट ह्या संकल्पनेऐवजी नफ्या तोट्याचा व्यवसाय बनवतो… सर्व कलाकारांनी अविचल अभिनय केला आहे. असे कुठेही वाटले नाही कि कलाकार भूमिकेला सादर करत आहेत, याउलट असे वाटले कि आम्हीच स्वतः आपल्या शरीरा बाहेर आलो आहोत .
तिसऱ्या दिवशी १२ ऑगस्ट रोजी ” न्याय के भंवर में भंवरी ” ह्या नाटकाची प्रस्तुती बघायला मिळाली… ह्या नाटकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘ बबली रावत’ या नाटकाच्या एकमेव अभिनेत्री होत्या. मानवी सभ्यतेच्या उदयापासून ते आजतागायत पितृसत्तेतून उगम पावलेल्या शोषणकारी आणि दडपशाही प्रवृत्ती ने स्रीच्या सामाजिक न्याय आणि समतेचा बळी घेतला आहे व कशाप्रकारे ह्या पुरुषप्रधान समाजात परंपरा आणि संस्कृतीच्या नावाखाली स्रीला गुलामीच्या बेड्यात अडकवण्याचे षडयंत्र रचले गेले, याचे सखोल विस्तारित वर्णन आणि विश्लेषण पाहायला मिळते. बबलीजींनी अत्यंत परिपक्वतेने स्रीच्या वेदनेला उघडपणे मांडले आणि संपूर्ण नाटकादरम्यान प्रेक्षकांच्या श्वासाला आपल्या लयतालाने रोखून धरले . ज्या दृढतेने त्यांनी , स्वतःला – “मर्द“ म्हणवून छाती फुगवणाऱ्या पुरुषांना आरसा दाखवला त्या अनुभवाला शब्दात व्यक्त करणे कठीणच! संकेत आवळे यांनी प्रकाश संयोजन उत्तम प्रकारे हाताळले आहे.
दिल्लीमध्ये थियेटर ऑफ रेलवन्स नाट्यदर्शना अंतर्गत रंगकर्मी व अभ्यासक स्मृती राज यांनी या रंगउत्सवाचे आयोजन करून दिल्लीला एक नाविन्यपूर्ण आणि अलौकिक रंग अनुभवासोबत एकरूप केले आहे. जेव्हा मी नाटक पाहायला गेले, तेव्हा हीच कल्पना होती की या नाटकांमध्ये देखील तेच काहीतरी पाहायला मिळेल , सामान्यतः जसे की आजपर्यंत आम्ही थिएटरमध्ये पाहतो. पण थिएटर ऑफ रेलेवन्स ने माझ्या धारणांना तोडले की – थिएटर फक्त एक मनोरंजनाचे साधन आहे. थियेटर हे मनुष्याच्या अंतरात्म्याला अंर्तमुख करून त्याला चेतना प्रदान करते.