कुमार बोस, रोणू मुझुमदार, गिरीधर उदुपा, देवकी पंडित यांची जुगलबंदी
भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील आघाडीचे तारे ‘रिवाज’ या अनोख्या अशा शास्त्रीय संगीत सोहळ्यामध्ये एकत्र येत आहेत. प्रख्यात तबलावादक पंडित कुमार बोस, बासरीवादक पंडित रोणू मुझुमदार, युवा घटमवादक गिरीधर उदुपा आणि आघाडीच्या गायिका देवकी पंडित हे कलाकार मुंबईत वरळी येथील नेहरू सेंटर येथे शुक्रवारी २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता होणा-या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.या कार्यक्रमाची तिकिटे १४ ऑगस्ट २०१५ पासून नेहरू सेंटर (२४९६४६८०) येथे उपलब्ध आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन इव्हेंट कंपनी आणि जिंजर पीआर यांनी केले असून युनियन बँक ऑफ इंडियाचे त्याला पाठबळ आहे. यावेळी संगीतकरांची एक संमिश्र फळी एकत्र येत असून या कलाकारांनी त्यांच्या जादुई अदाकारीने संगीत क्षेत्रात अनेक मनाचे तुरे कमावले आहेत. देवकी पंडित (गायन) यांना तबल्यावर रामदास पळसुले आणि हार्मोनियमवर सुधीर नायक साथ देणार आहेत. त्यानंतर बासरीवादक पंडित रोणू मुझुमदार, विख्यात तबलावादक पंडित कुमार बोस आणि युवा घटमवादक गिरीधर उदुपा यांची अदाकारी पेश होणार आहे. या सर्वांच्या सादरीकरणाचा अनुभव मुंबईकरांसाठी चिरकाल स्मरणात राहणारा आणि अविस्मरणीय असाच असेल.
कार्यक्रमाची सुरुवात प्रख्यात गायिका देवकी पंडित यांच्या गायनाने होणार आहे. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील असून वयाच्या केवळ दुसऱ्या वर्षी त्यांना संगीताची तोंडओळख झाली. त्यांच्या आई उषा पंडित यांच्याकडे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर दहा वर्षे त्यांनी वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे, बारा वर्षे पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे आणि किशोरी आमोणकर यांच्याकडे चार वर्षे त्यांनी प्रशिक्षण घेतले. २००३ पासून त्या बबनराव हळदणकर यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांनी वयाच्या केवळ नवव्या वर्षी कार्यक्रम केला आहे. ‘अर्धांगिनी’ या मराठी चित्रपटासाठी त्यांनी १९८५ साली पहिल्यांदा पार्श्वगायन केले. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांनी कित्येक मराठी मालिकांसाठी शीर्षकगीते गायिली आणि काही हिंदी गाणीही गायली. देवकी पंडित यांना तबल्यावर रामदास पळसुले आणि हार्मोनियमवर सुधीर नायक साथ देणार आहेत.
या कार्यक्रमाची सांगता आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले आणि प्रख्यात तबलावादक पंडित कुमार बोस, बासरीवादक पंडित रोणू मुझुमदार आणि युवा घटमवादक गिरीदार उदुपा हे कलाकार करणार आहेत. पंडित कुमार बोस हे प्रख्यात तबलावादक असून ते कोलकाता येथील संगीताची पार्श्वभूमी असलेल्या एका घरात जन्माला आले. त्यांचे वडील दिवंगत पंडित विश्वनाथ बोस आणि आई दिवंगत विदुषी भारती बोस या दोघांनीही त्यांना अगदी छोट्या वयात संगीताची गोडी लावली. त्यानंतर त्यांना बनारस घराण्याचे तबलावादक पंडित किशन महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेता आले. आपली स्वतःची अशी एक शैली पेश करणे हे पंडित बोस यांच्या व्यक्तिमत्वाचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. स्वतःची वेगळी शैली जपताना परंपरेचे पावित्र्य भंग होणार नाहि याची ते पुरेपूर काळजी घेतात. त्यातून ते आपल्या जगभरातील चाहत्यांना मंत्रमुग्ध करत आले आहेत. ‘बन्यान’ अर्थात बास ड्रमवरील त्यांच्या हातखंड्यामुळे त्यांनी युवा आणि ज्येष्ठ रसिक त्यांचे चाहते झाले आहेत. त्यांनी आत्तापर्यंत १५० हूनही अधिक ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या आहेत.
पंडित रोणू मुझुमदार यांना राष्ट्रपतींचे सुवर्ण पदक मिळाले असून १९८१ साली त्यांना आल इंडिया रेडीओ स्पर्धेमध्ये पहिला पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर त्यांना १९९६ साली त्यांना ग्रामी पुरस्काराचे नामांकन मिळाले. अमेरिकेतील बेंजोवादक बेला फ्लेक यांच्याबरोबर ‘तबुला रस’ या अल्बमला ग्रामी पुरस्काराचे नामांकन झाले आहे. ‘पॅसेजेस’सारख्या काही अल्बमसाठी त्यांनी रवीशंकर प्रसाद यांच्याबरोबर काम केले आहे आणि ‘चांट्स ऑफ इंडिया’ यांसह साधारण ३० अल्बम त्यांच्या नावावर जमा आहेत. १९९९मध्ये त्यांना संगीतातील त्यांच्या अतुल्य योगदानासाठी आदित्य विक्रम बिर्ला पुरस्काराने गौरविण्यात आले. २००१ मध्ये त्यांना ‘ज्योती दिवसा’च्या निमित्ताने सहारा इंडिया परिवार जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
गीरीधर उदुपा हे मृदंगम विद्वान उल्लूर नागेंद्र उदुपा यांचे पुत्र आहेत. त्यांनीच त्यांना मृदंगम, कंजीरा आणि घटम यांसारखी वाद्ये शिकविली. त्यानंतर ते विदुषी घटम सुकन्या रामगोपाल आणि विद्वान घटम व्ही सुरेश यांचे शिष्य बनले. ते ‘कान्नाकोल’ ही वाद्यांमधील अभ्यासक्रमातील महत्वाची कला सदर करतात. त्यांनी आपल्या अदाकारीला वयाच्या चौथ्या वर्षी सुरुवात केली आणि आज आपल्या निर्दोष शैली आणि नैसर्गिक प्रतिभेच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध करत असतात.
‘रिवाज’ ही भारतीय शास्त्रीय रागांच्या शोधाची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. यात कलाकाराला त्याचे कौशल्य आणि साधना रसिकांसमोर मांडण्यासाठी पुरेसा कालावधी लागतो. त्याचमुळे एका किंवा दोन कलाकारांबरोबर एक संपूर्ण संध्याकाळ रसिकांनी घालवावी अशी ही संकल्पना आहे. त्यातून श्रोता आणि कलाकार या दोघांनाही समाधान मिळते. आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या परिस्थितीत अशा प्रकारची संकल्पना ही दुर्मिळ वाटावी अशीच आहे, असे उद्गार प्रख्यात बासरीवादक पंडित रोणू मुझुमदार यांनी काढले आहेत.
द ईव्हेंट कंपनी आणि जिंजर पीआर या संस्था भारतातील उच्च शास्त्रीय संगीत परंपरा जगातील संगीत रसिकांसमोर सादर करण्यासाठी कटिबद्ध आहेत. त्याचसाठी त्यांनी अनेक संस्कृतिक कार्यक्रमांचे आणि त्यातही शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम संपूर्ण देशभर सादर केले आहेत. या कार्यक्रमांची संकल्पना आणि त्यांचे व्यवस्थापन तसेच सहकार्यातून आयोजन अशाप्रकारची जबबदारी या संस्था घेतात.