सामाजिक विषयावर भाष्य करणारा नवा सिनेमा
मराठी सिनेमांची संख्या ही झपाट्याने वाढत असली तरी केवळ मनोरंजनात्मकच नव्हे सामाजिक विषयांवर भाष्य करणारे सिनेमेदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचे चित्र आपल्याला पहायला मिळत आहेत. अशाच एका सामाजिक विषयावर भाष्य करणारा ‘मोहर’ हा सिनेमा १ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
व्ही.जी. एन्टरप्राईजेसच्या चंद्रकांत पंढरीनाथ पवार, संगीता गौतम सातदिवे आणि लीप एंटरटेनमेंटच्या गुरुनाथ मिठबावकर, आशिष राजे यांचे विशेष सहकार्य लाभलेल्या या ‘मोहर’ सिनेमाचे दिग्दर्शन विजय पाटकर यांनी आहे.
सर्वप्रथम मी निर्मात्यांचे आभार मानतो की, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला कारण ह्या सिनेमाचा विषय तसा वेगळा आहे. मुळात कॉमेडी हा माझा जॉनर आहे. पहिल्यांदाच मी अशा विषयांचा सिनेमा हाताळला आहे.या सिनेमाचे दिग्दर्शन माझा अगदी जवळचा मित्र संजीव नाईक करणार होता परंतु अपघातामुळे त्याला शक्य झाले नाही. त्यामुळे या सिनेमाच्या दिग्दर्शनासाठी निर्मात्यांना त्याने माझे नाव सुचविले आणि सिनेमा सुरु होण्याआधी केवळ अठरा दिवस असताना मी हा सिनेमा स्वीकारला. त्यातील केवळ सहा-सात दिवस मला बाकीची तयारी करण्यासाठी मिळाले, असे असुनही कलाकार तसेच इतर तंत्रज्ञ मंडळीचे उत्तम सहकार्य लाभल्याने हा सिनेमाही तितकाच उत्तम झाला आहे आणि तो तुम्हालाही नकीच आवडेल.
‘मोहर’ सिनेमाची कथा निवृत्ती आणि तायनू यांच्याभोबाती गुंफण्यात आली आहे. या दोघांच एकमेकांवर जीवापाड प्रेम, त्यांना दोन मुलं असा त्यांचा छोटेखानी संसार. निवृतीच आयुष्य ऋतू चक्रासारखच त्याच्या कुटुंबात अशाच आकस्मात आलेल्या वादळाने कोमेजत.समज गैरसमजातून निर्माण झालेल्या संघर्षात ते होरपळतात. तायनूच्या आयुष्याला पुन्हा ‘मोहर’ येतो का? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला हा सिनेमा पहावा लागणार आहे.
या सिनेमात सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, प्रसाद ओक, अभिनेत्री अदिती सारंगधर यांच्या मुख्य भूमिका असून सोबत विजय कदम, हेमलता बाणे यांचाही उत्तम अभिनय आपल्याला पहायला मिळणार आहे. बालकलाकार प्राजक्ता जगताप व चैतन्य घाडगे यांनी ‘मोहर’ सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. मानसी नाईकने आपल्या दिलखेचक अदानी एक उत्तम लावणी सादर केली आहे. सिनेमाची कथा रेखा सुरेंद्र जगताप यांची असून पटकथा, संवाद दिपक भागवत यांनी लिहिले आहेत.राहुल जाधव, सुरेंद्र आणि अनंत मोरे यांनी लिहिलेल्या गीतांना मिलिंद मोरे यांचे उत्तम संगीत लाभले असून सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे, प्रसन्नजीत कोसंबी, कविता, चॅंन्ग, साक्षी यांच्या सुमधुर आवाजात ही गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत.
दिपाली विचारे यांनी या सिनेमासाठी कोरिओग्राफ़र म्हणून काम पाहिले असून कॅमेरामन म्हणून राजा फडतरे यांनी काम पाहिले आहे. येत्या नवीन वर्षी १ जानेवारीला ‘मोहर’ हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.