थिएटरला नवीन पैलुंशी जोडताहेत मंजुल भारद्वाज
थिएटर ऑफ रेलेव्हन्सच्या माध्यमातून मंजुल भारद्वाज यांनी थिएटरला मंचावरून सर्वसामान्य जीवनात प्रतिस्थापित केलं आहे. त्यांची नाटके ही केवळ शोपुरतीच मर्यादित नसतात, तर क्षणोक्षणी ती आपल्याला अस्वस्थ करीत, विचारांच्या मध्यभागी आणून बसवतात आणि आपलं जीवन, आपला समाज यांची आपल्याकडूनच समीक्षा करून घेतात. हे मंजुल यांचे स्वतःचे सृजन आहे. -धनंजय कुमार
मंजुल भारद्वाज यांनी आपली रंगयात्रा एक साधारण रंगकर्मी म्हणून सुरु केली होती. तेव्हा त्यांच्यात एक रंगकर्मी म्हणून तीव्र उत्साह आणि काही चांगलं करून दाखवण्याची चमक तर होती पण अशी रंगदृष्टी नव्हती जिच्या दाखवलेल्या मार्गावरून चालत मंजुल आपल्या ध्येयापर्यंत पोहचू शकतील, जिथे त्यांची अवचेतना त्यांना नेऊ पाहत होती. एकीकडे त्यांनी रंगकर्म स्वीकारला खरा पण त्याचबरोबर ते आपल्या समकालीन रंगकर्माशी ताळमेळ साधू शकेना. ६०च्या दशकात भारतवर्षात रंगक्रांतीच्या रुपात उभारलेले रंगकर्म हे दिल्लीस्थित, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या परिसरापूरतेच सीमित होते. बाकी शहरांमध्ये अमैचूअर नाट्य संस्था रडत-खडत थिएटर चालवत होत्या. थिएटर करण्याचं उद्दिष्ट शो करण्यामध्ये रूपांतरित झालं होतं. रंगकर्मी थिएटर तर करत होते मात्र थिएटर करण्याची भावना समूळ नष्ट होत चालली होती. थिएटर एकतर टीव्ही किंवा सिनेमात रोल मिळवण्याचं एक माध्यम म्हणून मर्यादित राहिलं किंवा स्वतःला आंनदी ठेवण्याचा एक मार्ग म्हणून.
मंजुल भारद्वाज थिएटरमध्ये या दोघांपेक्षा वेगळया भूमिकेच्या शोधात होते. अस्वस्थतेत त्यांनी केवळ भरतमुनींचं नाट्य शास्त्रच वाचलं नाही तर जगातील रंगविचारांचं अध्ययन केलं आणि त्यातून त्यांनी असा निष्कर्ष काढला कि, जागतिक रंगचिंतकांनी प्रयोग करून अथवा व्यवहारिक शोधांपेक्षा सैद्धान्तिक विचार – विमर्शावर अधिक जोर दिला आहे, खरंतर इथे व्यवहारिक पक्षावर सगळ्यात जास्त काम करण्याची गरज आहे, कारण थिएटरमध्ये जनक्रांतीच्या संभावना असीम आहेत. परंतु काही कारणास्तव थिएटर आलेख आणि अभिनेता यांच्या स्तरावर येऊन थबकले आहे. थिएटरला केवळ काही उपकरणे आणि प्रदर्शनांपुरते सीमित ठेवणे म्हणजे, थिएटरच्या रचनात्मक संभावना आणि क्षमतांना कूंद करणे आहे. हे म्हणजे, त्याच्या वास्तविक योग्यतेलाच कमी करणे आहे. थिएटरला त्याच्या पुढे घेऊन जाण्याची गरज आहे आणि याच विचारांती मंजुल भारद्वाज यांनी थिएटर ऑफ रेलेव्हन्सचा निर्माण केला.
या अनुषंगाने त्यांनी थिएटर विषयी ५ मुद्दे रचले.
१. थिएटर, जे आपल्या उच्चतम सृजनशीलतेने विश्वाला अधिक उत्तम आणि मानवीय बनवण्यासाठी प्रतिबद्ध असेल.
२. थिएटर, ज्यात केवळ कलेसाठी कला नसून त्यात प्रासंगिक सामाजिक संदर्भ असतील आणि आपली कर्तव्ये पार पाडणारी असेल.
३. थिएटर, जे मानवी गरजा समजून त्याला अभिव्यक्तीसाठी, स्वतःचे मत मांडण्यासाठी मंच उपलब्ध करून देईल.
४. थिएटर, जे स्वतः परिवर्तनाचं माध्यम बनेल.
५. थिएटर, जे मनोरंजनाच्या सीमेतून बाहेर पडून जीवन जगण्याचा मार्ग बनेल.
मात्र या क्रमात मंजुल भारद्वाज थिएटरच्या कलात्मक आणि मनोरंजनात्मक पक्षालाही विसरत नाहीत आणि ते भरतमुनीं सोबतच स्तानिस्लावस्की, मेयर होल्ड, आंत्वा आर्तो आणि ब्रेख्त इ. देश विदेशातील सिद्धांतकारांच्या रंगविचारांना पुढे घेऊन जाताना दिसतात. स्तानिस्लावस्कीच्या आधीच्या रंगविचारकांनी नाट्यलेखाला जास्त महत्व दिले, जिथे स्तानिस्लावस्की ने नाट्यलेखापेक्षा जास्त महत्व अभिनयाला देऊन त्याला वैज्ञानिक रूप दिले आणि त्याला काल्पनिक फेऱ्यातून काढून सत्याच्या अधिक जवळ आणलं. त्यांची ठाम समजूत होती कि जोपर्यंत अभिनय विश्वसनीय होणार नाही, तोपर्यंत प्रस्तुतिचा वास्तविक प्रभाव दर्शकांसमोर उठून दिसणार नाही. त्याकरिता त्यांनी कलाकारांना त्यांचे शरीर आणि भावना यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठी कुशल उपाययोजना दिली आहे जिच्या आधारे कलाकार परिस्थिति आणि दर्शकांच्या उपस्थिति ने प्रभावित न होता आपल्या भूमिकेला अधिक विश्वसनिय बनवून सादर करू शकतील.
मंजुल कलाकारांसोबत अभिनयावर काम करताना या तंत्राला मानवीय पैलूंची जोड देतात आणि नाट्यलेखाच्या प्रत्यक्ष पात्रालाच अभिनेता म्हणून प्रेक्षकांसमोर प्रस्तुत करतात, जेणेकरून नाट्यलेखाचा मौलिक आवेग संवेदनांसहित प्रेक्षकांसमोर सादर होऊ शकेल आणि नाटकाचा अधिकतम प्रभाव प्रेक्षकांवर पडू शकेल.
अशा प्रकारे मंजुल स्तानिस्लावस्कीच्या रंगचिंतनाला नवीन रूप तर देतात मात्र याच क्रमात ते नाट्यलेखाच्या महतीलाहि कमी करत नाहित. ब्रेख्तप्रमाणेच ते नाट्यलेखालाही तितकेच महत्व देतात आणि नाट्य प्रयोगापूर्वी अभिनेत्यांसोबत कार्यशाळा करत ते अभिनेत्यांना नाट्यलेखाविषयीची गंभीरता आणि त्याच्या घटनाक्रमांच्या इतके जवळ घेऊन जातात की अभिनेता नाट्यलेखातील पात्र असणारा कलाकार नाही तर वास्तववादी पात्र होऊन जातो. ते घटनाक्रमांच्या सर्व पैलूंचा आधी विचार करतात, कलाकार त्याला आत्मसात करून विषयाला अभिव्यक्त करतात. या क्रमाने जाताना नाट्यलेखात अनेक बदलही घडून येतात आणि नाटक केवळ लेखकाचं नाटक न राहता प्रेक्षकांच्या जीवनातील परिस्थितींमध्ये बदलून जाते. इथे हे जाणणं गरजेचं आहे मंजुल नाट्यलेखकालाही सत्य आणि कल्पनाशीलतेच्या मधे वावरण्याची संधी देतात, इथे मंजुल आंत्वा आर्तोच्या चिंतनाला पुढे घेऊन जाताना दिसतात.
आर्तोदेखील नाट्य आलेखांविषयी इतर रंगविचारकांपेक्षा वेगळी विचारप्रणाली ठेवत असंत, त्याचे ठाम मत होते की, आधी नाट्यलेखाशी आपले नाते तुटणे गरजेचे आहे आणि मग शोधायला हवे, त्या विस्ताराला, त्या आलेखाच्या विचार आणि हावभावांना जी लेखकाच्या अद्भुत लेखन शैली आणि भाषेत समाविष्ट आहे. असं करताना मंजुलचे हे प्रयत्न असतात की, नाटक पाहताना प्रेक्षक केवळ दर्शक न राहता, त्याला हे वाटावं कि हे त्याचेच भोगलेले, पाहिलेले किंवा ऐकलेले सत्य पुनर्रप्रकट होत आहे. ते अभिनयासोबतच नाट्यलेखालाही विश्वसनीयनियतेच्या शीर्षावर घेऊन जातात कारण मंजुल आपल्या नाट्यप्रयोगात सगळ्यात अधिक महत्व प्रेक्षकांना देतात. ते प्रेक्षकांना पहिला रंगकर्मी मानतात. त्यांचे ठाम मत आहे की नाट्यप्रयोग दर्शकांशिवाय असंभव आहे. म्हणूनच ते प्रेक्षकांच्या आसपासच्याच विषयांना आपल्या नाट्यलेखाची विषयवस्तू बनवतात. अशाप्रकारे मंजुल इथे दुसरे रुसी रंगचिंतक मेयरहोल्डच्या बाजूने जाताना दिसतात.
मेयरहोल्डच्या दृष्टीनेदेखील दर्शकांना विशेष महत्व होतं. त्यांचा रंगमचं पूर्णपणे दर्शकांना समर्पित होता आणि आलोचकांची प्रतिक्रिया काहीही असो ते दर्शकांच्या दृष्टीला नेहमी सोबत घेऊन जात असत. मेयरहोल्ड मानत असत की रंगमंचावर दर्शकाचीही समान भागीदारी आहे. त्याच्याशिवाय रंगमंचाची कल्पनाही केली जात नाही. मात्र त्याचबरोबर ते आपल्या दर्शकांकडून वेळ आणि गंभीरतेची अपेक्षा ठेवतात. त्यांचे मानणे होते की, ज्या प्रेक्षकांकडे वेळेची कमी आहे, त्या प्रेक्षकांना नाट्यप्रस्तुति पाहण्यासाठी बोलावणं हा रंगमंचाचा अपमान आहे. मात्र मंजुल मेयरहोल्डपासून एक पाऊल पुढे जाऊन, प्रेक्षकांना शोधत बसण्यापेक्षा किंवा त्यांना बोलावत बसण्यापेक्षा प्रेक्षकांची गरज बनून जातात. ते नाट्य प्रस्तुतीचा विषय दर्शकांतून निवडतात आणि प्रदर्शनासाठी मंचाच्या शोधात ते प्रेक्षकांपासून दूर नाही तर त्यांच्या मधेच मंच स्थापित करतात.
मेयरहोल्ड अभिनेता असण्यासोबत लेखक आणि दिग्दर्शकदेखील होते. त्यांचे ठाम मत होते की, एका दिग्दर्शकाचं काम हे पूर्ण समर्पणाचं काम आहे. त्याने एक नाटककारही असणे गरजेचे आहे, अभिनेता असणे गरजेचे, चित्रकारही, संगीतवादक आणि इलेक्ट्रीशियनदेखिल असणे गरजेचे इतकेच नाही तर त्याला शिवणकाम आणि सुतारकामदेखील यायला हवे.
मंजुलचे देखील हेच मत आहे. ते एका रंगकर्मीमध्ये साऱ्या गुणांची अपेक्षा ठेवतात आणि रंगकर्मीच्या याच संपूर्णतेच्या शोधात तेदेखील मेयरहोल्ड प्रमाणेच रंगप्रशिक्षणाचे कार्य अवलंबतात.
पश्चिमी रंगजगताने ज्या मानवीय विचाराला मनोव्यवहारीक सीमांमध्ये बांधून ठेवलं होतं त्याला फ्रेंच रंगकर्मी आंत्वा आर्तोने आपल्या क्रांतिकारी चिंतनाने तोडलं आणि मानवीय आत्ममुक्तीचा नवा विचार समोर ठेवला, ज्याला ‘ क्रूरतेचे रंगमचं’ या नावाने ओळखले जाते. आर्तोची ठाम समजूत होती की, आधी या समाजाला रद्द करणे गरजेचे आहे. समाजाची मुळापासून सफाई होणे गरजेचे आहे, तेव्हाच रंगमंचाचा विचार त्यांची खरी मदत करेल. या क्रमात आर्तोने आधी लिहिलेल्या नाट्यलेखांच्या प्रदर्शनासही विरोध केला. त्यांचे स्पष्ट मानणे होते की जे दृश्य बनेल ते सरळ मंचावर तयार होईल. तिथे त्या मंचासाठी आवश्यक अशा सर्व सामुग्रीला प्रयोगात आणले जाईल. मंजुल भारद्वाज लिखित नाट्यलेखांना भलेही नाकारत नसले तरी ते नाट्य लेखकांना लेखनाच्या नव्या शैलीची ओळख करून देतात. ते लेखकांना समाजातील घटना प्रसंगाच्या जवळ घेऊन जातात आणि भोगलेल्यांच्या अनुभवांशी, त्यांचे वलय आणि त्यांचा पाया यांच्याशी साक्षात्कार करवून मग लेखनाचे स्वातंत्र्य देतात.
आर्तोप्रमाणेच मंजुलदेखिल अभिनेत्यांना अभिनित पात्रांचे मुखवटे घालण्याऐवजी त्या अभिनेत्याला स्वतःचे मुखवटेदेखील उतरवण्याची प्रक्रिया अलंबतात, जेणे करून अभिनेता आपल्या शरीरातून बाहेर पडून नाट्य चरित्राच्या काल्पनिक आणि तरीही वास्तविक देहात प्रवेश करून त्या चरित्राची पीडा, आनंद, समस्या आदी विभिन्न भावाभिव्यक्ती इतक्या इमानदारीने सादर करू शकेल की नाटकातील पात्र काल्पनिक न राहता पूर्णपणे वास्तविक रुपात साकार होऊन जाते.
मंजुल भारद्वाज थिएटरला केवळ प्रेक्षकांच्या मनोरंजनापूरतेच किंवा कलाकार किंवा नाट्यप्रयोगाशी जोडलेल्या रंगकर्मींच्या आत्मसंतुष्टीचे माध्यम इतकेच मानत नाहीत तर, जीवनातील बदल आणि सामाजिक राजनैतिक क्रांतीचे उतप्रेरक या दृष्टीने ते याकडे पाहतात. जसे की मेयरहोल्ड आणि ब्रेख्तदेखील मानत होते. मात्र हे मानत असताना मंजुल, रंगमंचावर आपले काम करता करता रंगकर्मी आणि प्रेक्षकांच्या आयुष्यातही हळूच डोकावतात आणि आपले नाट्यविचार, नाट्यव्यवहार आणि नाट्य प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांच्या विचारप्रक्रियेत सामावून जातात आणि मग न केवळ त्यांच्या विचारला प्रभावित करतात तर त्यांच्यात बदल आणि क्रांतीची गरज आणि ठिणगी पेटूवून देतात. असे करताना ते प्रेक्षकांना कोणताही ठराविक रस्ता न सुचवता, योग्य आणि नवीन मार्ग निवडण्याचा विवेक निर्माण करतात.
ब्रेख्त आपला अभ्यास विचार न करता वापरत नसत. त्यांचे मानणे होते की याचे प्रयोग समजदारीने केले गेले तर ते समाजातील क्रियाकलापांना उजेडात आणतात आणि याला विचार न करता वापरले तर याच्या अनुकरणाचे काही कारण नाही दिसत. याचकरिता शिकण्याची प्रक्रिया संयोजित असणे गरजेचे आहे असेच अभिनेता हा इतर अभिनेत्यांसोबत शिकणे. याचे कारण असे की लघुत्तम सामाजिक एकक हा एकटा व्यक्ती नसून दोन लोकं आहेत. जीवनातही आपण एकमेकांचा विकास करत असतो. मंजुल हा प्रयोग केवळ रिहर्सल पुरताच सीमीत न ठेवता आपल्या कार्यशाळेतही जोरदार अवलंबतात, मग ती कार्यशाळा रंगकर्मींची असो वा लहान मुलांची किंवा शासकीय ऑफिसर्सची. असे करताना मंजुल रंगभूमीपासून दूर असणाऱ्या व्यक्तींच्या आतही थिएटरचे रोपण करतात. त्यांच्यात थिएटरविषयी जागरुकता आणि चेतनेचा निर्माण करतात आणि मग ती व्यक्ती केवळ दर्शक न राहता रंगकर्मी होऊन जाते आणि रंगकर्माला केवळ मनोरंजन किंवा अभिव्यक्तीचे माध्यम न मानता आपल्या आत बदल घडवून आणण्याचा पाया मानतात आणि हीच अनुभूती व्यक्तीच्या आत सामाजिक – राजनैतिक क्रांतीचा जोश भरते आणि क्रांतीची मशाल स्वीकारण्यासाठी त्याला सहर्ष तयार करते.
मंजुल दर्शकांसोबतही अद्भुत प्रयोग करतात. ते दर्शकांना नाट्य प्रस्तुती दर्शवून केवळ टाळ्या वाजवण्याइतपत सीमित पाहत नाहीत तर, ते प्रेक्षकांना आपल्या प्रदर्शनात सहभागीही करून घेतात. एका नाट्य प्रस्तुतीच्या वेळेस ते आपल्या कलाकारांतर्फे प्रेक्षकांच्या हातात राख देतात आणि कलाकार त्यांच्या हातात राख देताना सांगतात, की ही त्या मुलीच्या चितेची राख आहे जिची काल हुंड्यासाठी तिच्या सासरच्यांनी जाळून हत्या केली. दर्शक चकित होऊन जातात. भावनांचा कल्लोळ त्यांच्या आत एकसाथ पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे घुसतो सहाजिकच तो दर्शक केवळ दर्शक न राहता तिथे प्रकट होणाऱ्या विचारांचा पोषक आणि विश्लेषक होऊन जातो. मंजुल अशा प्रकारचे प्रयोग आपल्या नाट्य प्रदर्शनात अनेकदा करताना दिसतात.
मंजुल आपल्या नाट्य प्रदर्शनासाठी कोणत्याही मंचासाठी आश्रित नसतात खरंतर ते जिथे त्यांना हवे तिथे मंच निर्माण करतात. गल्ली, मैदान, शाळेचा परिसर, झोपडपट्टी इतकंच नाही तर गप्पा मारत उभे राहण्याच्या छोट्याश्या जागेचेही ते मंचात रूपांतर करतात. कारण ते मानतात कि थिएटर साठी दोन व्यक्तीदेखिल खूप आहेत.
-धनंजय कुमार