२० ऑगस्टला पहिले पुष्प गुंफणार नवोदित कवी
महाराष्ट्रामधील नामवंत जनकवी पी. सावळाराम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दर महिन्याला कवीसंमेलन आयोजित केले जाणार असून, पहिले पुष्प गुंफण्याची संधी नवोदित कवींना मिळणार आहे.
इच्छूक नवोदित कवींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि बरोबर येताना जी कविता सादर करणार आहे, त्या कवितेची झेरॉक्स प्रत सोबत आणावी असे आवाहन ठाणे जिल्हा चिटणीस कवी बाळासाहेब तोरस्कर यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पुण्याच्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने ठाणे जिल्हा शाखेतर्फे पी. सावळाराम कवीसंमेलन बारा सत्रांमध्ये आयोजित केले आहे. वर्षभरामध्ये बारा सत्रांमध्ये हा कवीसंमेलनाचा कार्यकम साहित्य परिषदेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे. दर महिन्याला होणा-या पी. सावळाराम कवीसंमेलनामध्ये पहिल्या भागामध्ये नवोदित कवींना स्वरचित कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे. नवोदित कवींनी सादर केलेल्या कवितांचे पुस्तकही दर महिन्याला प्रकाशित होणार आहे.
कवितेचा कोणताही प्रकार (प्रेम, निसर्ग, वर्षा, सामाजिक आणि इतर विषय) सादर करण्यास मुभा राहणार आहे. नवोदित कवींना कविता सादर केल्याबद्दल सन्मानपत्रही देण्यात येणार आहे.
कवीसंमेलनाच्या दुस-या भागामध्ये काही नामवंत कवी भाग घेणार आहेत. त्यामध्ये प्रा. अशोक बागवे, डॉ. महेश केळुस्कर, अरुण म्हात्रे, भगवान निळे, मेघना साने, बाळासाहेब तोरस्कर, अनुपमा प्रधान, छाया कोरेगावकर, विजयकुमार पाटणकर, शाम माळी, सुरेखा मालवणकर, प्रदिप पवार, प्रा नलिनी कुडूक, कल्पना सुळे, सुरेखा गायकवाड, शितल मालूसरे, अनंत जोशी, राजरत्न राजगुरु, रामदास व्हराडी, जयंत भावे, सतीश सोळांकूरकर, शशिकांत तिरोडकर, रजनी निकाळजे, संतोष म्हाडेश्वर, शामराव सुतार ,मेधा जोशी, संतोष तावडे, ज्योती शिंदे, सुरेशश्वर शुक्ल, शशिकांत सावंत, माधव दीक्षित, प्रकाश पोळ, विजय फडणीस, मकरंद वांगणेकर, संदीप कांबळे.
या कविसंमेलनाचे पहिले सत्र शनिवार दिनांक २० ऑगस्ट २०१६ रोजी, सायंकाळी ५:०० वाजता. मराठी ग्रंथ संग्रहालय, पोंक्षे वॉच कंपनीच्यावर, गोखले रोड, ठाणे येथे होणार आहे. पी. सावळाराम यांचे सुपुत्र संजय सावळाराम पाटील कवी संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुप्रसिद्ध कवियत्री सुवर्णा जाधव भूषविणार आहेत या कार्यक्रमाला कोपरखैरणे नवी मुंबई येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा शोभा रासकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
संपर्क : अ.भा.म.सा.प. ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय,
नीळकंठ बिल्डींग, पहिला मजला, गाडगीळ ज्वेलर्ससमोर,
राममारुती रोड, ठाणे (पश्चिम)
भ्रमणध्वनी ८८७९९२११२१,९३२२२६१९४२,
९८१९३२१५५६,९७६९९२१५५६