‘घाडगे & सून’मधील जोडप्याने घेतले खंडोबाचे आशीर्वाद
घाडगेच्या परंपरेनुसार नव्या नवरा-नवरीने लग्नानंतर एकदा जोड्याने जाऊन खंडोबाचे आशीर्वाद घ्यायचे असतात. याच वेळेस अक्षय आणि अमृताला जेजुरी मंदिराच्या ४०० पायऱ्या चढायच्या होत्या. परंतु अमृताच्या पायाला अचानक लागल्यामुळे अक्षयने अमृताला उचलून घेतले आणि खरोखरच सीनमध्ये चिन्मयने मंदिराच्या ३०० पायऱ्या चढल्या.

अक्षयच्या प्रेमात पडलेल्या अमृतासाठी मात्र हा विधी एका नव्या नात्याची सुरुवात करून देणारा क्षण ठरणार आहे… खंडोबाच्या दर्श्नासोबतच अक्षय-अमृताच्या लग्नाचा जागरण-गोंधळाचा विधीही पार पडणार आहे…
या जेजुरीच्या वारीबद्दल बोलताना चिन्मय म्हणाला, “जेजुरीला आमच्या संपूर्ण टीमवर देवाचीच कृपा झाली असं मी म्हणेन. शुटींग दरम्यानची मज्जा वैगरे नेहेमीच असते पण आम्हाला ती जागा अलौकिक वाटली. मी भाग्यश्रीला उचलून तब्बल ३०० पायऱ्या चढलो, माई म्हणजे सुकन्या ताईदेखील आमच्याबरोबर होत्या. आमचं पूर्ण युनिट पायऱ्या चढून वर गेलो. पण दुसऱ्या दिवशी सगळे त्याच जोमाने शुटींगला हजर होते. आता याला काय म्हणावे “देवाचीच कृपा”.