शैक्षणिक व्यवस्थेवर भाष्य
निर्माते गणेश पाटील आणि शंकर म्हात्रे यांची निर्मिती असलेल्या, शैक्षणिक व्यवस्थेवर भाष्य करणा-या ‘कॉपी’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त आॅडिओ गॅरेज स्टुडिओ, जुहू येथे गीतध्वनीमुद्रणाने करण्यात आला. याप्रसंगी गायक प्रविण दोणे यांनी गायलेलं ‘चालला चालला जीक पांघरूनिया…’’ हे गीत रेकॉर्ड करण्यात आलं.
राहुल साळवे यांनी लिहिलेल्या या गीताला रोहन प्रधान-रोहन गोखले (रोहन-रोहन) या संगीतकार जोडीने संगीत दिलं आहे. या प्रसंगी दिग्दर्शक-अभिनेते विजय पाटकर चित्रपटातील कलाकार अंशुमन विचारे, जगन्नाथ निकंगुणे, विपुल साळुंखे तसंच तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होते.
‘श्री महालक्ष्मी क्रिएशन्स’ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन हेमंत धबडे आणि दयासागर वानखेडे करणार आहेत. ‘कॉपी’ हा चित्रपट समाजातील समाजातील शिक्षण व्यवस्थेर भाष्य करणारा आहे. या चित्रपटाच्या अनुषंगाने शिक्षण व्यवस्थेचा मुद्दा चर्चेला येणार यात शंका नाही.
या चित्रपटाच्या विषयाबाबत बोलताना हेमंत धबडे-दयासागार वानखेडे हे दिग्दर्शक द्वयी म्हणाले, ‘एकेकाळी शिक्षकांना देवाप्रमाणे पूजले जायचे, पण आज शिक्षणाच्या बाजारीकरणाचा परिणाम शिक्षणासोबतच शिक्षकावरही झाला आहे. विशेषत: ग्रामीण भागातील शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे शिक्षकांची मानसिकता बदलली आहे. या कारणामुळे शिक्षकांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होत आहे. शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या मानसिकतेचा आढावा ‘कॉपी’ या चित्रपटाच्या निमित्ताने घेण्यात येणार आहे. आज समाजात जे घडतंय ते दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला जाणार आहे. या निमित्ताने शिक्षण व्यवस्थेत होणारा काळा बाजारही उजेडात येईल यात शंका नाही.’
‘कॉपी’ची संकल्पना गणेश रामचंद्र पाटील यांची आहे. हेमंत धबडे आणि दयासागर वानखेडे यांनी राहुल साळके यांच्या साथीने या चित्रपटाची कथा लिहिली असून पटकथालेखन हेमंत-दयासागर यांनीच केलं आहे. दयासागर यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. कॅमेरामन सँटिनिओ टेझिओ या चित्रपटाचं छायालेखन करणार असून संदिप कुचिकोरवे यांनी कलादिग्दशर्नाची जबाबदारी सांभाळली आहे.
कोरिओग्राफर रॉकी हारळे या चित्रपटातील गीतांसाठी कोरिओग्राफी करणार आहेत. मिलिंद शिंदे, कमलेश साकंत, अंशुमन विचारे, जगन्नाथ निकंगुणे, विपुल साळुंखे, अनिल नगरकर, कैलास वाघमारे, राहुल बेलापूरकर, आशुतोष काडकर, पूनम वाघमारे, सौरभ सुतार, प्रवीण कापडे आणि रवी वीरकर या कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. रवींद्र तुकाराम हारळे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता असून जय घोंगे आणि तपिंदर सिंग प्रॉडक्शन मॅनेजर आहेत.